breaking-newsराष्ट्रिय

भीषण ! हरियाणात धुक्यामुळे 50 गाड्या एकमेकांवर आदळल्या, सात जणांचा मृत्यू

हरियाणात धुक्यामुळे 50 गाड्या एकमेकांवर आदळून भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. अपघात झालेल्या गाड्यांमध्ये शाळेच्या बसचाही समावेश आहे. दिल्ली आणि हरियाणादरम्यान असणाऱ्या रोहतक-रेवारी हायवेवर हा अपघात झाला आहे.

हरियाणामधील जज्जर येथे अपघात झाला असून मृत झालेल्या सात जणांपैकी सहा महिला आहेत. अपघातात गाड्यांचा अक्षरक्ष: चुराडा झाला असून रस्त्यावर गाड्यांची रांग लागली होती. दुर्घेटनेची माहिती मिळताच बचावकार्य सुरु करण्यात आले होते. अनेकजण कारमध्ये अडकले होते, त्यांना बाहेर काढण्याचं काम सुरु होतं. अपघातानंतर दोन किमी लांब गाड्यांच्या रांगा लागल्या होत्या.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

: 7 killed in 50 vehicle pileup on Rohtak-Rewari highway due to dense fog conditions

18 people are talking about this

हरियाणा, दिल्ली, पंजाब, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील अनेक ठिकाणी दाट धुके पडले असून दृश्यमानता कमी झाली आहे. 500 मीटरच्या अंतरावरही स्पष्ट दिसत नाही आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button