breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
भिडेंनाच आंबे खाऊ घालावे लागतील, म्हणजे त्यांना मुलं होतील – बच्चू कडू
पिंपरी – माझ्या शेतातील आंबे खालल्यानंतर मुलं होतात, असं वादग्रस्त वक्तव्य करणा-या मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनाच आंबे खाऊ घालावे लागतील. म्हणजे त्यांना मुले होतील, अशी टिका आमदार बच्चू कडू यांनी सोमवारी (दि. 11) पत्रकारांशी बोलताना केली.
बच्चू कडू म्हणाले की, आंबे खाऊन मुलं होत असल्याचे भिडे म्हणत आहेत. मात्र, त्यांनाच मुले नाहीत. आता त्यांनाच आंबे खाऊ घालावेत. म्हणजे त्यांनाही मुले होतील. त्यांनी अशा पध्दतीने वक्तव्य करणे चुकीचे आहे. ते समाजात अंधश्रद्धा पसरवित आहेत. त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला पाहिजे. त्यासाठी स्वतः पाठपुरावा करणार आहे, असेही कडू यांनी सांगितले.