#Lockdown:सोशल डिस्टन्सिंग पाळत कलाविश्व पुन्हा ‘ऍक्शन’मध्ये येण्याच्या तयारीत
मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव चिंतेचा विषय ठरत असला तरीही आता लॉकडाऊनच्या या काळातून टप्प्याटप्प्याने कसे बाहेर पडता येईल याचाच विचार सर्व स्तरांमधून करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रपट निर्माते, नाट्य निर्माते, कलाकार, दूरचित्रवाणी वाहिन्यांचे निर्माते यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली.
सोशल डिस्टन्सिंग आणि इतर नियमांचे काटेकोर पालन करत मर्यादित प्रमाणात चित्रपट, मालिका, कार्यक्रमांचे चित्रीकरण किंवा निर्मितीनंतरच्या प्रक्रिया सुरु करता येतील का याबाबत निश्चित असा कृती आराखडा दिल्यास त्यावर विचार करता येईल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले. महाराष्ट्रातील मनोरंजन उद्योगातील विशेषत: मराठी चित्रपट, नाट्य क्षेत्र, मालिका यांचे निर्माते, कलाकार यांच्याशी बुधवारी त्यांनी संवाद साधला.
सुबोध भावे, आदेश बांदेकर यांनी केले. तर खासदार डॉ अमोल कोल्हे, चित्रपट महामंडळ अध्यक्ष मेघराज राजे भोसले, प्रसाद कांबळी, निखिल साने, नितीन वैद्य, सुनील फडतरे, केदार शिंदे अतुल परचुरे, अवधूत गुप्ते, मंगेश कुलकर्णी, रवी जाधव, विजू माने, राहुल देशपांडे, अजय भालवणकर, मुक्ता बर्वे, केदार शिंदे, सुकन्या मोने, पुष्कर श्रोत्री, हेमंत ढोमे, प्रशांत दामले, सुभाष नकाशे, प्रसाद महाडकर, शरद पोंक्षे, विद्याधर पाठारे यांची यादरम्यान उपस्थिती होती. या मंडळींनी अतिशय महत्त्वाच्या मुद्द्यांवर उद्धव ठाकरे यांच्याशी संवाद साधत कलाविश्वाच्या कार्यपद्धतीविषयी काही महत्त्वाच्या सूचना करत आपल्या समस्याही मांडल्या.