breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीराजकारणराष्ट्रिय

भारतीय मीडियानेही ग्लोबल होण्याची गरज; पंतप्रधानांचा सल्ला

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितलेले की, सध्या अशी वेळ आहे की जेथे भारताचा आवाज आणि लोकल वस्तू ग्लोबल होत आहेत. भारताच्या मीडिया इंडस्ट्रीलाही ग्लोबल होण्याची गरज आहे. भारताचे लोकल प्रोडक्ट ग्लोबल होत आहेत. भारताचा आवाजही अधिक ग्लोबल होत असल्याचे दिसत आहे. जगात भारताचा आवाज आवर्जुन ऐकला जात आहे. आंतरराष्ट्रीय प्लॅटफॉर्ममध्ये भारताचं अस्तित्व खूप दांडगं आहे. अशा परिस्थितीत भारतीय मीडियानेही ग्लोबल व्हायला हवंय, असं मत पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलेलं आहे.

कोरोनाच्या काळात मीडियाने अभूतपूर्व मार्गाने काम केलं आहे आणि नागरिकांना कोरोनाबाबत जागृत केलेलं आहे. त्याबरोबरच सरकारचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचवलेले आहेत. वेळेप्रसंगी मीडियाने सरकारवर टीकाही केलेली आहे. मात्र प्रत्येकाला टीकांमधून शिकायचं असतं..अशातूनही आपली लोकशाही बळकट होईल, असेही पंतप्रधान यावेळी म्हणालेले आहेत. दुसरीकडे भारत-चीन तणावादरम्यान भारताने चीनविरोधात अनेक कडक पावले उचललेली आहेत. आता केंद्र सरकारने 7.3 लाख कोटी रुपयांचे मोबाइल फोन निर्यातीच्या कामासाठी Apple आणि सॅमसंगला मंजुरी दिलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button