breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भाज्यांचे किमान भाव निश्चित करणारे ‘केरळ’ देशातील पहिले राज्य

शेतकऱ्यांसाठी फळे आणि भाज्यांचे किमान भाव (एमएसपी) निश्चित करणारे केरळ देशातील पहिले राज्य ठरले आहे. हे भाव उत्पादन खर्चापेक्षा २० टक्के अधिक असतील. सध्या सरकारने १६ फळे-भाज्यांचे भाव निश्चित केले आहेत. याशिवाय २१ खाद्यान्नासाठी एमएसपी निश्चित केली आहे. ही योजना १ नोव्हेंबरपासून लागू होईल. तोवर राज्यात उत्पादित होणाऱ्या इतर फळ-भाज्यांचे भाव निश्चित केले जातील. याचा लाभ १५ एकरपर्यंत जमीन असलेल्या शेतकऱ्यांना होणार आहे. ही फळे-भाज्या विकण्यासाठी राज्यात १ हजार स्टोअर्स उघडली जातील. केरळनंतर आता पंजाब, महाराष्ट्र, कर्नाटकसारख्या राज्यातील शेतकरीही ही योजना लागू करण्याची मागणी करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button