breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजप सरकारविषयी नागरिकांमध्ये असंतोष – राहुल नार्वेकर

उरण, (महा-ई-न्यूज) – सत्ताधारी भाजपच्या काळात सर्वसामान्य नागरिकांवर अन्याय झाला आहे. नागरिकांमध्ये सरकारबाबत असंतोष निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांनी घराबाहेर पडून आघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना निवडून देण्याचा शरद पवार यांना दिलेला शब्द पाळायचा आहे, असे आवाहन राष्ट्रवादीचे नेते राहूल नार्वेकर यांनी बेलपाडा येथे केले.

मावळ लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे उमेदवार पार्थ पवार यांचा प्रचारदौरा उरण भागात जोमाने सुरू आहे. यावेळी राष्ट्रवादीचे रायगड जिल्हा सरचिटनिस प्रशांत पाटील, महेंद्र घरत, शेकापचे नेते मेघनाथ तांडेल, सिडकोचे माजी संचालक प्रमोद इंदुराव आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

नार्वेकर म्हणाले की, उरण परिसरातल्या जनतेवर पवार साहेबांनी ख़ूब प्रेम केलं आहे. लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी केंद्रात तसेच राज्यात सरकारमध्ये असताना मदत केली आहे. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अरक्षण दिले. कठीण काळात पवार साहेब व्यवसायिकांच्या पाठीशी उभेराहिले आहते. त्यामुळे पवार साहेबांना जो आपण शब्द दिला आहे. तो येणा-या लोकसभा निवडणुकीत सर्वांनी पाळायचा आहे. सध्या मावळ मतदार संघात प्रचार दौरा जोरात सुरू आहे. युवकांनी, तरुणांनी सर्वांनी घराबाहेर पडून पार्थ पवार यांना मतदान करण्यासाठी लोकांना प्रोत्साहित केलं पाहिजे, असेही नार्वेकर म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button