breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणेमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“सरपंच ते पंतप्रधान पदाच्या निवडणुकीत भाजपला मोदींशिवाय पर्याय नाही”; सुप्रिया सुळेंचा भाजपला टोला

सत्तेच विकेंद्रीकरण आणि पंचायत राज हे यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सुरू

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल मुंबईत विविध कार्यक्रामांचे उद्घाटन झाले. या पार्श्वभूमीवर भाजप खूप मोठं पक्ष आहे. भाजपात खूप मोठ्या नेत्यांची फळी असतानाही सरपंच ते पंतप्रधान पदाच्या निवडणुकीत भाजपला मोदींशिवाय पर्याय नाही, असा टोला खासदार सुप्रिया सुळे यांनी लगावला आहे.

सुप्रिया सुळे पुणे महापालिका आयुक्त यांच्याशी मतदार संघातील विविध प्रश्नांबाबत चर्चा करण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्या बोलत होत्या सत्तेच विकेंद्रीकरण आणि पंचायत राज हे यशवंतराव चव्हाण यांच्यापासून सुरू आहे. यात प्रत्येक गोष्टीत कामाचं विभाजन झालेलं होत. गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही मागणी करत आहोत की जिल्हा परिषद आणि महापालिकेच्या निवडणुका या घेण्यात याव्या. पण ज्यांना आपण प्रेमाने ईडी सरकार ते त्यांच्या स्वार्थासाठी निवडणूक घेत नाही. पण यात सर्वसामान्य माणूस हा भरडला जात आहे. सर्वसामान्य नागरिकांची कामे होत नाहीत, असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.

कसबा आणि चिंचवड येथील पोटनिवडणूकीवर महाविकास आघाडीतील नेते मंडळी बसून यावर निर्णय घेतील, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांच्या बारामती दौऱ्याबाबत सुळे म्हणाल्या की, बारामतीत जे कोणी येतात त्यांचं स्वागतच होणार. आमच्यावर अतिथी देव भवचे संस्कार झाले आहेत.

देशात मागच्या तीन वर्षात सर्वाधिक स्टार्टअप हे महाराष्ट्रात झाले आहेत. यात पुणे जिल्ह्यात सर्वाधिक स्टार्टअप झाले आहेत. हा केंद्र सरकारच डाटा आहे. देवेंद्र जी यांना माझी विनंती आहे की पुणे जिल्ह्यात गुन्हेगारी वाढली आहे. कोयता गँग हे काय प्रकरण आहे हे देखील आता समोर आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button