भाजपकडून महासभेचे कामकाज नियमबाह्य – माजी महापाैर मंगला कदम
- अर्थसंकल्पाच्या मंजुरीनंतर नगरसेवकांची चर्चा घेणे अयोग्य
- आयुक्तांना शहराच्या विकासाबाबत नाही गांर्भिय
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प विशेष महासभेत सादर करुन मंजुर केला. तत्पुर्वीच आयुक्तांना त्याच्या अधिकार कक्षेत अर्थसंकल्प अमंलबजावणी सुरु केलेली आहे. महासभेत अर्थसंकल्पास मंजुरी दिल्यानंतर त्यावर चर्चा करणे हे महासभा कामकाजास धरुन नाही. महासभेचे कामकाज नियमबाह्य चालविले जात असल्याचा आरोप माजी महापाैर मंगला कदम यांनी पत्रकार परिषदेत केला.
पिंपरी चिंचवड महापालिकेचा अर्थसंकल्प आज (शनिवारी) विशेष महासभेत मंजुर करण्यात आला. त्यानंतर विरोधी पक्ष कार्यालयात त्या पत्रकारांशी बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, आज गरज नसताना अंदाजपत्रक सभा घ्यायला नको होती. त्यावर चर्चा नाही, उपसुचना नाही, ही सभा विनाकारण बोलविली असून नगरसेवकांचा अमुल्य वेळ वाया घालविला आहे.
तसेच पावसाळा सुरु झाला तरीही आत्पकालीन परस्थितीचा आढावा घेतलेला नाही. शहरातील कच-याची अवस्था बिकट झालेली आहे. कचरा गाड्या उपलब्ध नाहीत. रोडस्विपर गाड्या बंद आहेत. नाले सफाई अर्धवट स्थितीत झालेले आहेत. पालखी मार्गावरील अजूनही पाहणी केलेली नाही. त्या वारक-यांचा सोयी-सुविधांचा आढावा घेतलेला नाही. संत नामदेवाचे शिल्प देखील अजूनही उभारण्यात आलेले नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांना शहराच्या विकासांचे गांर्भिय नाही. असा आरोपही कदम यांनी केला.