breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भंडारा : चिमुरड्यांचा मृत्यू राज्य सरकारच्या निष्काळजीपणामुळेच – महापौर राहुल जाधव

पिंपरी / महाईन्यूज

भंडारा जिल्हा सरकारी रुग्णालयात लागलेल्या आगीत 10 बालकांचा मृत्यू झाला. या घटनेमुळं महाराष्ट्रासह संपूर्ण देश होरपळून गेला आहे. यातच पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर राहुल जाधव यांनी घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत भंडाऱ्याच्या घटनेची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भात राहुल जाधव आपल्या आकाऊंटवरुन पोस्ट शेअर केली आहे. त्यात त्यांनी ‘भंडाऱ्यात आगीत होरपळून नवजात बालकांचा झालेला मृत्यु ही अतिशय दु:खद व हृदय हेलावणारी घटना आहे. यातून ग्रामीण रुग्णालयाच्या व्यवस्थेतील दोष आणि कमतरता पुढे आल्या आहेत. चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. तसेच, इतर बालकांना वाचवण्यासाठी ज्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले असतील, त्यांचंही मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर राज्य सरकारनं संपूर्ण आरोग्य व्यवस्था मजबूत करावी, अशी मागणी राहूल जाधव यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button