breaking-newsराष्ट्रिय

बोलण्याचा विपर्यास केला गेला तर खुलासा पवार साहेबांनी का केला नाही- तारीक अन्वर

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्वोसर्वा शरद पवार यांनी कथित राफेल विमान गैरव्यवहार प्रकरणी पंतप्रधान नरेंद्रा मोदी यांनी बाजू घेतली.  शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लीन चिट दिली होती. तसेच मोदींच्या हेतूवर जनतेला संशय नसल्याचं ते म्हणाले होते. या पवार यांच्या भूमिकेबद्दल देशामध्ये एक वेगळेच वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे अनेकांनी राजीनामा देण्यास सुरुवात केले होती.

यामध्ये सर्वात मोठे नाव होते राष्ट्रवादीचे खासदार ष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सचिव ‘तारीक अन्वर’ यांनी लोकसभेतल्या आपल्या खासदारकीचा आणि पक्षाचा राजीनामा दिला होता. या अनेक घटनानंतर राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्या सुप्रिया सुळे पुढे आल्या आणि त्यांनी सांगितले की, शरद पवार यांच्या वक्तव्याचा विपर्यास झाला आहे.

यानंतर तारीक अन्वर यांची मुलखात घेतली गेली. त्यावर ते म्हणाले, ” मला नाही माहिती की शरद पवार यांना काय म्हणायचे होते. परंतु, जसे माझ्या पाहण्यात आले आणि वाचण्यात आले त्यावरून मी हा निर्णय घेतला आहे. एका प्रकारे पवारसाहेब पंतप्रधानांची बाजू घेताना दिसले,त्यांनी आपल्या वक्तव्यातून एकप्रकारे मोदींना क्लीन चीट दिल्याचे स्पष्ट होते. त्यांच्या बोलण्याचा विपर्यास केला गेला तर ४८ तासांनंतर देखील तसा खुलासा पवार साहेबांनी का केला नाही ?”

तारीक अन्वर यांच्या राजनाम्याची अनेक करणे सांगितले जात असून ते आता काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचे समजते आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button