breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

फोर्ट येथे कोसळलेल्या इमारत दुर्घटनेमध्ये 4 जणांचा मृत्यू; तर,आतापर्यंत 13 लोकांना बाहेर काढण्यात यश

गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह परिसरामध्ये मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामध्ये कच्च्या किंवा धोकादायक इमारतींमुळे फार मोठा धोका उद्भवतो. आज मुंबईतील फोर्ट परिसरातील भानुशाली इमारतीचा काही भाग कोसळल्याची घटना समोर आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, एनडीआरएफच्या पथकाचे बचाव कार्य सुरु आहे. अशात आतापर्यंत 13 जणांना ढिगाऱ्याखालून बाहेर काढण्यात यश आले आहे. यामध्ये 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

गुरुवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दक्षिण मुंबईतील फोर्ट परिसरातील पाच मजली भानुशाली इमारतीचा काही भाग कोसळला. या ठिकाणी चालू असलेल्या मदत आणि बचाव कार्यादरम्यान आतापर्यंत 13 लोकांची सुटका करण्यात आली असून त्यापैकी चार जण गंभीर जखमी आहेत, तर चौघांचा मृत्यू झाला आहे. ढिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांसाठी रात्री उशिरापर्यंत शोध मोहीम चालू आहे. या घटनेबद्दल माहिती मिळताच खासदार अरविंद सावंत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आदी मंडळी घटनास्थळी दाखल झाली होती.

महानगरपालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाकडून मिळालेल्या माहितीनुसार छत्रपती शिवाजी टर्मिनस जवळील फोर्ट येथील भानुशाली इमारतीचा 40 टक्के भाग अचानक कोसळला. ही माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या व एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत सतत पाऊस पडत असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत असुरक्षित इमारती कोसळण्याचा धोका वाढला आहे. जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या लोकांना त्यांच्या सुरक्षिततेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.

भानुशाली इमारत ही धोकादायक होती व तिला नोटीसही बजावण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. ही दुर्घटना घडली तेव्हा इमारतीमध्ये 20 जण होते. दरम्यान याआधी मालाडच्या अब्दुल हमीद मार्ग येथील चाळीचा भाग कोसळल्याची घटना समोर आली होती. या ठिकाणी सुद्धा बचाव कार्य सुरु करण्यात आले आहे. तर जखमींना रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात येत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button