पुढील पाच वर्ष सरकार मजबूत, धोका नाही – संजय राऊत
मुंबई : महाराष्ट्र अस्थिर करण्याचे प्रयत्न अंगलट येतील असा इशारा शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी देताना पुढील पाच वर्ष सरकार मजबूत आहे. २०२५ पर्यंत कोणताही धोका अजिबात नाही. १७० आमदार आघाडी सरकारच्या बाजूने आहेत. यात वाढ होऊन हा आकडा १८० पर्यंत जाऊ शकतो, असे स्पष्ट केले. विरोधकांकडून राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा प्रयत्न असेल तो त्यांचा हा प्रयत्न भ्रम असेल, असे राऊत म्हणालेत. राज्यातील परिस्थिती अस्थिर करण्याची प्रयत्न करण्यात येत असल्याची चर्चा जोर धरु लागली आहे.
दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रीया देताना म्हटले आहे की, उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्ष ठाकरे सरकारच्या पाठीशी मजबूत उभे आहे. काँग्रेस – राष्ट्रवादी – शिवसेना पक्ष एकत्र आहेत. त्यामुळे काहीही चिंता करण्याचे कारण नाही.