breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

“पी.चिदंबरम यांची अटक ही सूडबुद्धीतून केलेली कारवाई होती”- राहुल गांधी

महाईन्यूज | दिल्ली

माजी केंद्रीय गृहमंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांना आयएनएक्स मीडिया प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून अखेर दिलासा मिळाला आहे. याप्रकरणात ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात न्यायालयानं चिदंबरम यांना दोन लाख रूपयांच्या जातमुचलक्यावर जामीन दिला आहे. त्यामुळे तब्बल १०६ दिवसांनी चिदंबरम यांचा तिहार तुरूंगातून बाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर काँग्रेसकडून ‘अखेर सत्याचाच विजय झाला, सत्यमेव जयते’ अशी प्रतिक्रिया देण्यात आली. यानंतर आता काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावर प्रतिक्रिया देताना, चिदंबरम यांची १०६ दिवसांची अटक ही सूडबुद्धीतून केलेली कारवाई होती, असा ट्विटद्वारे आरोप केला आहे.

पी. चिदंबरम यांची १०६ दिवसांची अटक ही सूडबुद्धीतून केलेली कारवाई होती. अखेर सर्वोच्च न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केल्याबद्दल मला आनंद आहे. मला विश्वास आहे की, निष्पक्ष सुनावणीत ते स्वतःला निर्दोष सिद्ध करतील असा विश्वास राहुल गांधी यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button