पिंपळेगुरव ते कन्याकुमारी सायकल प्रवास
पिंपळेगुरव – पिंपळेगुरव ते कन्याकुमारी या भारताच्या शेवटच्या टोका पर्यंतचा १५५० किलोमीटरचा प्रवास अवघ्या ११ दिवसात पूर्ण करण्यात आला. या प्रवासा मध्ये “क्लीन इंडिया ग्रीन इंडिया ” हा स्वच्छ भारत अभियानाचा जनजागृतीचा संदेश ज्ञानेश्वर उर्फ माऊली जगताप , विशाल कदम व राहुल खुटाले यांनी दिला.
१९ डिसेंबर पासून पिंपळेगुरव येथील भैरवनाथ मंदिरापासून हा प्रवास सुरू करण्यात आला. कन्याकुमारीला पोहोचल्यानंतर या तरुणांनी स्वामी विवेकानंद यांना राष्ट्रीय युवक दिनानिमित्त वंदन केले. याअगोदर या तरुणांनी पुणे ते गोवा “स्वच्छ भारत मिशन” उपक्रमामध्ये सहभाग घेऊन सायकल प्रवास केला होता.शहरातील वाढते वायुप्रदूषण ध्वनिप्रदूषण रोखण्यासाठी सायकल या वाहनाचा चांगला पर्याय म्हणून उपयोग होऊ शकतो. म्हणून सायकल चालवणे हे शहरातील नागरिकांच्या मनात बिंबवण्याचा प्रयत्न या मित्र परिवाराच्या वतीने करण्यात आला आहे.
तरूणांच्या या प्रेरणादायी कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. शहरातील युवकांनीही अशा उपक्रमामध्ये सहभाग घ्यावा. स्वछतेचे पालन करणे ही केवळ सरकारचीच जबाबदारी नसून ती प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, त्यांच्या या कामगिरीचा सार्थ अभिमान आहे.