breaking-newsपुणेमहाराष्ट्रमुंबई

पावसामुळे एसटीचे वेळापत्रक कोलमडले

  • पुणे-मुंबई दरम्यान तब्बत दोन तास उशीराने एसटी बसेस

पुणे – मुंबईत गेल्या दोन-तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम एसटी वाहतुकीवर झाला आहे. सोमवारी सकाळी पुण्याहून मुंबई, ठाणे, दादर, बोरिवलीला गेलेल्या एसटी, शिवशाही बसेस परत येताना नियोजित वेळेपेक्षा तब्बल दोन तास उशीराने दाखल होत असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. पर्यायाने पुण्याहून मुंबईला जाणाऱ्या गाड्यांवरही याचा परिणाम झाला. यामुळे पुणे-मुंबई दरम्यान धावणाऱ्या गाड्यांचे वेळापत्रक पुरते विस्कळीत झाले असून या दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना याचा मनस्ताप सहन करावा लागला.

मुंबईमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांपासून पावसाचा जोर वाढतच आहे. यामुळे या मार्गावरील वाहतुकीवर याचा परिणाम होत असून वाहतूक संथ गतीने सुरू आहे. मुसळधार पाऊस, मार्गावरील वाहतूक कोंडी यामुळे पुणे-मुंबई दरम्यान वाहतूक विस्कळीत झाली होती. पुण्याहून मुंबई, ठाणे, दादरला एसटी बसेससह शिवशाही गाड्या सोडल्या जातात. स्वारगेट, शिवाजीनगर, पुणे स्टेशनहून दादर, बोरिवली, ठाण्याकरिता दर अर्ध्या तासाने शिवनेरीची वातानुकूलित सेवा आहे. तसेच साधी एसटी, हिरकणी आदींची सेवा पुरवली जाते. सोमवारी झालेल्या पावसामुळे या बसेसला पोहोचण्यासाठी उशीर होत होता. यामुळे पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवाशांचे हाल झाल्याचे दिसून आले.
पुणे-मुंबई हे राज्यातील दोन महत्त्वाची शहर असून या दरम्यान प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र गेल्या दोन दिवसांपासून मुंबईतील पावसामुळे वाहनांचा वेग मंदावत आहे. परिणामी शहरातून जाणाऱ्या तसेच मुंबईहून येणाऱ्या एसटी बस नियोजित वेळेपेक्षा उशिरा पोहोचत होत्या. लोणावळा घाटातील जोरदार पाऊस, “एक्‍स्प्रेस वे’ वरील वाहतूक कोंडीमुळे एसटी, शिवनेरीचे वेळापत्रक विस्कळीत झाले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button