breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पालिका प्रशासनाच्या १४ दिवसांच्या ‘जनता कर्फ्यू’ ला बारामतीकरांचा विरोध

बारामती – सध्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामतीत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे पुन्हा एकदा १४ दिवसांच्या जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. पण, बारामतीकरांनी या जनता कर्फ्यूला विरोध दर्शवला आहे.

बारामती नगरपालिका प्रशासनाकडून ७ सप्टेंबर ते २१ सप्टेंबर या १४ दिवसांच्या कालावधीसाठी “जनता कर्फ्यू” लागू होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. अनेक लोकांच्या बंद बाबतीत मागणी स्वरुपाच्या सूचना आल्यामुळे हा बंद घेण्यात आल्याचे पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. वास्तविक पाहता ‘कोरोना रुग्णांची संख्या व परिस्थिती गंभीर असल्यामुळे प्रशासनास हा निर्णय घेणे जरूरीचे वाटत असले तरी, व्यापारी आणि प्रातिनिधिक स्वरुपात नागरिकांबरोबर चर्चा होणे गरजेचे होते. कोरोना इतकीच गंभीर परिस्थिती व्यापारी आणि सामान्य नागरिक यांची आर्थिक बाबतीत झालेली आहे’ असे म्हणत बारामती मर्चेन्ट्स असोसिएशनने जनता कर्फ्यूच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे.

‘मागील लॉकडाउननंतर आता कुठे परिस्थिती थोड़ी सावरत असताना पुन्हा हा “संपूर्णतः” स्वरुपाचा लॉकडाउन होऊ घातला आहे. शेतकरी वर्गाचे खरीप हंगामाचे पिक बाजारात येऊ घातले आहे. मुग,बाजरी,मका ही पिके निघालेली असून रोजच पावसाचे सावट असताना ती विकण्यासाठीची व्यवस्था उपलब्ध नसेल तर शेतकरी वार्गाची मोठी कुचंबना होणार आहे. यावर चर्चा होणे गरजेचे वाटते आहे. एमआयडीसीच्या व्यापारी वर्गाबरोबर ज्या प्रकारे प्रशासनाने चर्चा करून मार्ग काढला आहे, अशा प्रकारची चर्चा व्हावी’, अशी मागणीही बारामती मर्चेन्ट्स असोसिएशनने केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button