पाणीपट्टी भरुनही सोसायट्यांना टॅंकर पाणीपुरवठा ; नगरसेवकांचे दुर्लक्ष
पिंपरी – चिखली, मोशी या परिसरातील अनेक सोसाट्याना महापालिकेच्या पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे त्या सोसाट्यांना आजही टॅंकरने पाणी पुरवठा करावा लागत आहे. याकडे पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे नवीन घरात रहायला जावून पाणी मिळत नसल्याने त्यांच्या आनंदावर विरजन पडले आहे.
अनेक नागरिकांना कर्ज काढून घरे विकत घेतली. शहरात स्वताःचे हक्काचे घर असावे म्हणून त्यांनी सगळा खटाटोप केला. त्यांनी महापालिका हद्दीतील सामाविष्ट गावात घर घेवून ते आनंदात राहायला आले. परंतू, त्या परिसरात पाणी टंचाई होत असल्याने नागरिकांना असंख्य अडचणीला सामोरे जावे लागत आहे. महापालिकेला हजारो रुपये पाणीपट्टी भरुनही पुरेसे पाणी मिळत नसल्यामुळे स्थानिक शेतकरी व जागा मालकांकडून बोअरवेलचे किंवा टॅंकरचे पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यावर सोसायट्यांना लाखो रुपये खर्च करावे लागतात. त्याकडे स्थानिक नगरसेवकही दुर्लक्ष करीत आहेत.