breaking-newsपिंपरी / चिंचवड

परतीच्या पावसाचा अंदाज घेऊन नियमित पाणी पुरवठ्याचा निर्णय घ्यावा – तुषार कामठे

  • भूजल पातळी वाढविण्याची नितांत गरज
  • गळती रोखल्यास पाणी बचत शक्य

पिंपरी, (महाईन्यूज) – सध्या पावसाचा जोर कायम असून पवना धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. तरी, महापालिकेने आणखी एक महिन्यानंतरच्या परतीच्या पावसाचा अंदाज घेऊन पाणी कपात असावी की दररोज पाणी पुरवठा करायचा, याबाबत निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी नगरसेवक तुषार कामठे यांनी केली आहे.

यासंदर्भात कामठे यांनी महापौर राहूल जाधव यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड शहराला पाणी पुरवठा करणा-या पवना धरणात मुबलक पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. दररोज पाणी पुरवठा करण्याची मागणी होत आहे. परंतु, आपल्याला केवळ जमिनीवरील पाण्याचा विचार करून चालणार नाही. कारण, भारत जगातील सर्वाधिक भूजल शोषीत पृष्टभाग आहे. त्यातील सर्वाधीक भूजल शोषण महाराष्ट्रात होत असते. उन्हाळ्याच्या अंतिम कालावधीत पाणी जमिनीतून काढावे लागते. त्यासाठी पाण्याची भूपातळी वाढण्याची गरज आहे. त्यासाठी उपाययोजना करणे आवश्यक आहे.

त्यातच आपल्याला पाणी बचतीची सवय लागणे अत्यावश्यक आहे. शहराची लोकसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे केवळ पवना धरणावर अवलंबून राहणे हिताचे नाही. भविष्यातील पाणी संकट टाळण्यासाठी इतरत्र धरणाचा स्त्रोत उपलब्ध करावा लागणार आहे. तोपर्यंत सध्या पुरवठा होणा-या पाण्याची बचत करणे जबाबदारीचे ठरणार आहे. दिवसाआड पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांना पाण्याची गरज भासणार नाही. शहरातील पाणीगळती रोखण्याची गरज आहे. त्यानंतर पाणीबचत आपोआप होणार आहे, असेही कामठे यांनी म्हटले आहे.

सध्या पावसाचा जोर कायम असला तरी महापालिका आयुक्तांनी एक महिन्यानंतरच्या परतीच्या पावसाचा अंदाज घ्यावा. त्यानंतर पावसाची स्थिती पाहून पाणी कपात कायम करायची की दररोज पाणी पुरवठा करायचा, याबाबत निर्णय घ्यावा, अशी मागणी कामठे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button