breaking-newsराष्ट्रिय
नागरिकांनो, खासदारांना संसदेत प्रश्न विचारण्यास भाग पाडा : कॉंग्रेस
नवी दिल्ली – आपल्या खासदारांना विचारण्यासाठी अधिकाधिक प्रश्न तुम्ही पाठवा, असे आवाहन सामान्य जनतेला काँग्रेसतर्फे करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्वीटर अकाऊन्टवरून याविषयी माहिती देण्यात आली आहे. आपल्या खासदारांना विचारण्यासाठी सामान्य नागरिकांनी प्रश्न विचारावेत असे आवाहन काँग्रेस पक्षाने केले आहे.
संसदेत खासदारांनी एका दिवसात विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांच्या संख्येत कमी केली आहे. आधी ही संख्या १०० होती ती आता कमी करून ५ करण्यात आली आहे. त्यामुळे आता आपल्या लोकशाहीच्या अधिकारांचा वापर करण्याची वेळ झाली आहे, असे कॉंग्रेसने आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे.