breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

धक्कादायक! केरळ विमान दुर्घटनेतील मृतांचा आकडा 18 वर, रनवेवर नेमकं काय घडलं?

केरळ: केरळमध्ये शुक्रवारचा दिवस हा ब्लॅक फ्रायडे ठरलेला आहे. दोन मोठ्या दुर्घटनांनी मोठी खळबळ उडालेली आहे. मुन्नार इथे शुक्रवारी सकाळी भूस्खलन झालं आणि त्यात 80 मजूर ढिगाऱ्याखाली दबल्याची माहिती समोर आली होती त्यापैकी 9 जणांचा मृत्यू झाला तर शुक्रवारी रात्री भीषण विमान अपघात घडलेला आहे.

वंदे भारत मिशन अंतर्गत दुबईहून केरळला येणाऱ्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात आतापर्यंत 17 जणांचा मृत्यू झाला असून 123 जण जखमी झालेले आहेत. या अपघातात महाराष्ट्राचे कॅप्टन दीपक साठे यांचाही मृत्यू झाला आहे. कोझिकोड विमानतळ हे टेबल टॉप एअरपोर्ट आहे. त्यामुळे इथे विमान उतरत असताना धावपट्टीवर खूपच काळजीपूर्वक उतरवावं लागतं. अशातच शुक्रवारी मुसळधार पावसामुळे रनवेवर पाणी होतं आणि पावसाचा जोर वाढल्यानं धुसर दिसत होतं.

माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे रनवेवर पाणी साचलं होतं याचवेळी विमान स्पीडने लँड झाल्यानं धावपट्टीवरून घसरून ते 35 फूट खोल खाली कोसळलं आणि दोन तुकडे झाले आहेत. धावपट्टीवरील पाण्यामुळे विमान घसरल्याचं सांगितलं जात आहे. दरम्यान, एअर इंडियाचं हविमान रनवेवरून घसरलं असून विमानाला मोठ नुकसान झालं आहे. या विमानात 170 प्रवासी होते. दुबईहून हे विमान कोझीकोडला आलं होतं. IX 1344 हे विमान होतं. कोझिकोड इथे धावपट्टीवर उतरत असताना हा अपघात झाला आहे. ‘वंदे भारत मिशन’च्या अंतर्गत हे विमान दुबईहून भारतात येत होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button