breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
15 जण ठार! विमान अपघातात ठार झालेला पायलट महाराष्ट्राचा सुपुत्र, दीपक साठे यांनी गमावला जीव
मुंबई : केरळमधल्या कोझिकोड विमातळवर एअर इंडियाच्या विमानाला मोठा अपघात झालेला आहे. या भयंकर अपघातात वैमानिकासह 15 जण ठार झाल्याचं वृत्त आलेलं आहे. तर 32 जण जखमी झाले आहेत. अपघातात जीव गमावलेले पायलट दीपक वसंत साठे हे महाराष्ट्रातील असल्याची माहिती आहे. ते NDA मध्ये कार्यरत होते.
विमान धावपट्टीवर उतरत होतं, तेव्हा प्रचंड पाऊस सुरू होता. केरळमध्ये गेल्या 24 तासांत मुसळधार पाऊस सुरू आहे. धावपट्टीवरून विमान घसरलं असावं असा प्राथमिक अंदाज आहे. याच अपघातात दीपक साठे या महाराष्ट्राच्या सुपुत्राचा मृत्यू झालेला आहे.