देशात 24 तासांत 32,981 नवे कोरोना रुग्ण
- भारत 97 लाखांच्या पार
नवी दिल्ली – देशात दररोज समोर येणाऱ्या नव्या कोरोना रुग्णसंख्येत मागील अनेक दिवसांपासून काहीशी घट झाल्याचे पाहायला मिळत आहे. मात्र आता देशातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 97 लाखांच्या पार गेल्याने चिंता प्रचंड वाढली आहे. त्यामुळे नागरिकांनी आपली काळजी घेणे आवश्यक आहे. गेल्या 24 तासांत देशात 26,567 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 385 कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला आहे. यासह देशाची एकूण कोरोना रुग्णसंख्या आता 97,03,770 वर पोहोचली आहे, तर कोरोनाबळींचा आकडा 1,40,958 इतका झाला आहे. तसेच आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, काल दिवसभरात 39,045 जण कोरोनामुक्त झाल्याने देशात आतापर्यंत 91,78,946 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली असून सध्या 3,83,866 जण कोरोनावर उपचार घेत आहेत.
वाचा :-भारत बंद : शेतकरी आंदोलनाला खतपाणी घालणारे काँग्रेस ढोंगी : प्रकाश जावडेकर
वाचा :-भारत बंद : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणतात ‘ही’ आहे सरकारची नैतिक जबाबदारी!
दरम्यान, गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने केंद्र सरकारकडून लॉकडाऊनची कडक अंमलबजावणी करण्यात आली. त्यानंतर अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या अनलॉकच्या काळात रुग्णसंख्येने मोठी उसळी घेतली होती. मात्र आता दिवसेंदिवस दिवसभरातील रुग्णसंख्या घटताना दिसत असली तरी एकूण रुग्णसंख्या 97 लाखांच्या पार गेल्याने चिंता वाढली आहे. त्यातच देशात कोरोनाची दुसरी लाट येण्याची भीतीही वर्तविली जात आहे.