देशात गेल्या 24 तासात 90 हजार जणांना कोरोनाची बाधा
- कोरोनाग्रस्तांचा आकडा पोहोचला 42 लाखांच्या पार
नवी दिल्ली – देशात कोरोनाचा कहर सुरूच आहे. गेल्या महिन्याभरापासून देशात रोजच रुग्णांची विक्रमी नोंद होत आहे. त्यामुळे भारतीयांच्या चिंतेत आणखीणच भर पडत आहे. भारतात कोरोनाने सुमारे 42 लाखांपेक्षा जास्त लोकांना ग्रासलं आहे. तर उपचारादरम्यान आतापर्यंत सुमारे 71 हजार जणांचा मृत्यु झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 32 लाख जणांनी कोरोनावर मात केली आहे.
केंद्रिय आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या 24 तासात 90 हजार 802 जणांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 1 हजार 16
जणांचा कोरोनामुळे मृत्यु झाला आहे. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा हा 42 लाख 4 हजार 614 वर पोहोचला आहे. तर आतापर्यंत उपचारादरम्यान दुर्दैवाने 71 हजार 614 रुग्णांचा मृत्यु झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, आतापर्यंत देशात सुमारे 32 लाख 50 हजार 429 जणांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी सुद्दा देण्यात आली आहे.