देशात आतापर्यंत १ कोटी ४ लाख ७३ हजार ७७१ कोरोना चाचण्या
नवी दिल्ली : देशातील कोरोना रूग्णांची संख्या साडेसात लाखांवर पोहचली आहे. बुधवारी सकाळी आरोग्य मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या अद्ययावत माहितीनुसार देशात एकूण रुग्णांची संख्या 7 लाख 42 हजार 417 आहे, ज्यामध्ये 20 हजार 642 लोकांचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासांत 22 हजार 752 नवीन रुग्णांची नोंद झाली असून 482 लोकांचा मृत्यू झाला आहे.
आतापर्यंत 4 लाख 56 हजार 831 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर 2 लाख 64 हजार 944 रुग्ण अजूनही उपचार घेत आहे. आयसीएमआरच्या आकडेवारीनुसार देशात 7 जुलैपर्यंत एक कोटी 4 लाख 73 हजार 771 नमुन्यांची चाचणी घेण्यात आली आहे. काल म्हणजेच 7 जुलै रोजी विक्रमी 2 लाख 62 हजार 679 चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
शनिवारी महाराष्ट्रात 7074 नवीन रुग्ण आढळले, रविवारी 6555, सोमवारी 5368 आणि मंगळवारी 5134 रुग्णांची नोंद झाली. महाराष्ट्रातील एकूण रुग्णांची संख्या 2,17,121 वर पोहोचली आहे. त्यापैकी 89 हजार 294 रुग्ण अजूनही उपचार घेत आहे. राज्यात आतापर्यंत 9250 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.