breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

देशातील अर्धी जनता उपाशी असताना नव्या संसद भवनाची गरज काय? कमल हसन यांची टीका

नवी दिल्ली – नव्या संसद भवनासाठी नुकतेच भूमिपूजन करण्यात आले. या नव्या संसदेसाठी तब्बल १ हजार कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. यामुळे नव्या संसद भवनाची गरज काय असा प्रश्न जनसामान्यांत पडला आहे. म्हणून प्रसिद्ध अभिनेते आणि मक्कल निधी मयम पक्षाचे अध्यक्ष कमल हसन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

वाचा :-संसद हल्ल्याला 19 वर्ष पूर्ण; पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केले शहीदांचे स्मरण

कमल हसन म्हणाले की, “अर्धा देश उपाशी झोपतो आहे. अशा परिस्थितीत एक हजार कोटींच्या संसद भवनाची गरज काय? कोरोना व्हायरसमुळे लोकांनी आपलं काम गमावलं आहे. चीनची भिंत बांधत असताना हजारो लोकांचा मृत्यू झाला. त्यावेळी त्यांच्या देशातील नेत्यांनी सांगितलं की ही भिंत तुमच्या संरक्षणासाठी आहे. आता माझा प्रश्न पंतप्रधान नरेंद्र मोदींना आहे की तुम्ही कुणाच्या संरक्षणासाठी नवं संसद भवन बांधत आहात? आदरणीय पंतप्रधानांनी मला या प्रश्नाचं उत्तर द्यावं”

वाचा :-आज रात्री 12.30 पासून RTGS सुविधा ग्राहकांसाठी 24 तास चालू होणार: RBI

तामिळनाडूत २०२१ मध्ये विधानसभा निवडणूक होणार आहे. कमल हासन यांनी या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. यावेळी नव्या संसदेच्या मुद्द्यावरुन कमल हासन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button