breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

‘… तो फिर सुन ले हुकूमत, हम तुझे नामर्द कहते हैं’; संजय राऊतांचा तिर निशाणा मोदींवर

मुंबई | महाईन्यूज

जेएनयू हल्ल्यावरुन केंद्र सरकारवर निशाणा साधण्यासाठी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. यातच एकेकाळचा भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेने पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या धोरणावर टीकास्त्र सोडलं आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून पुन्हा एकदा मोदी सरकारवर परखड टीका केलेली आहे. प्रसिद्ध उर्दू कवी मुन्नवर राणा यांच्या ट्विटला राऊत यांनी रिट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये मुन्नवर राणा यांनी सध्या देशात असणाऱ्या परिस्थितीवर भाष्य करत मोदींवर घणाघात केलेला आहे. ‘अगर दंगाइयों पर तेरा कोई बस नहीं चलता, तो फिर सुन ले हुकूमत, हम तुझे नामर्द कहते हैं’ या शायराना अंदाजमध्ये मुन्नवर राणा यांनी समाचार घेतलेला आहे.

मुन्नवर राणा हे नेहमी देश आणि समाजातील विविध मुद्द्यावर साहित्याच्या माध्यमातून आवाज उचलतात. एकेवेळी राणा यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव करत मोदी १०० वर्ष राज्य केलं तरी मुस्लिमांना अडचण नाही. मागील ६० वर्षात ज्यांनी राज्य केलं ते मुस्लिम थोडी होते. तर त्यानंतर देशात सरकारने दिलेला पुरस्कार परत करण्याचं सुरु होतं त्यावेळी राणा यांनीही केंद्र सरकारला त्यांचा पुरस्कार परत केला होता. देशातील परिस्थिती नाजूक असल्याने त्यांनी हा पुरस्कार परत केलेला होता. यानंतर राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेटही घेतलेली होती. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button