Uncategorized

ते विमान दिल्लीतून उडवणार आहेत का? शिवसेनेचा नारायण राणेंना टोला

सर्वांच्या सांघिक प्रयत्नाने चिपी विमानतळ सुरू होणार असून, मी म्हणणारे दिल्लीतून विमान उडवणार नाहीत. त्यांंना चिपीतच यावे लागेल, असा जोरदार टोला राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री उद्य सामंत यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव न घेता लगावला आहे. चिपी विमानतळ हे सिंधुदुर्ग जिल्हयात येते असल्यामुळे तेथील विमान वाहतूकीस परवानगी केंद्र सरकार देत असले तरी रस्ते पाणी हे राज्य सरकारच पुरवत आहेत, असेही सामंत म्हणाले.

ते मळगाव येथे शिवसेना पदाधिकाºयांच्या आयोजित बैठकीनंतर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, अतुल रावराणे, तालुकाप्रमुख रूपेश राउळ, विक्रांत सावंत उपस्थीत होते.

मंत्री सामंत म्हणाले, चिपी विमानतळाचे काम आता पूर्ण होत आले आहे. विमानतळाचा प्रकल्प जरी केंद्र सरकारच्या अख्यत्यारित येत असला तरी विमानतळाला लागणाºया सोयी सुविधा या राज्य सरकार पुरवणार आहे. या विमानतळाकडे जाणाºया रस्ता, पाणी, विज यासाठी सरकार तसचे आमदार, खासदार नियोजनचा फंड खर्च झाला आहे. त्यामुळे सर्व काही मीच करणार असे म्हणणे योग्य नाही. विमानतळ सुरू करणे हा सांघिक प्रयत्न आहे. त्यामुळे सर्वांनी मिळून सुरू करूया असे म्हणणे योग्य ठरणार आहे. मी केले म्हणतात ते विमान दिल्लीतून उडवणार आहेत का, त्यांना चिपीतच यावे लागणार आहे, असा टोला ही सामंत यांनी लगावला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button