ताथवडेच्या ‘इंदिरा कॉलेज’ला युजीसीचा “स्वायत्त महाविद्यालयाचा” दर्जा प्राप्त
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी
ताथवडे येथील चाणक्य एज्युकेशन सोसायटी संचलित इंदिरा वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाला विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) “स्वायत्त दर्जा” जाहिर केला आहे. याबाबत युजीसीचे मान्यता पत्र नुकतेच महाविद्यालयालास प्राप्त झाले आहे. स्वायत्त दर्जा मिळाल्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न राहून नविन अभ्यासक्रम निर्मिती व परीक्षा पध्दती राबविण्यासाठी महाविद्यालयाला स्वातंत्र्य मिळणार आहे. हा दर्जा पुढील १० वर्षासाठी असेल, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. जनार्दन पवार यांनी केली. यावेळी उपप्राचार्य प्रा. शिवेंदू भूषण हे उपस्थित होते.
इंदिरा महाविद्यालय कायम दर्जेदार शैक्षणिक उपक्रम व कामगिरीसाठी आग्रही राहिलेले आहे.
स्वायत्त दर्जा प्राप्त झाल्यामुळे विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शैक्षणिक अभ्यासक्रम उपलब्ध करून देता येतील. त्यामुळे विद्यार्थी जागतिक स्पर्धेमध्ये ठामपणे ऊतरू शकतील, असा आशावाद संस्थेच्या संस्थापिका डॉ. तरिता शंकर यांनी व्यक्त करून महाविद्यालयाच्या कर्मचा-यांना पुढील शैक्षणिक धोरणांविषयी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या.
आजच्या जागतिकीकरणाच्या व औद्योगिकीकरणाच्या स्पर्धात्मक काळामध्ये विद्यार्थ्यांना अधिक
सक्षम करण्याकरीत नवनविन अभ्यासक्रम राबविणे, उदयोग समूहांबरोबर सामंजस्य करार करून
विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान मिळवून देणे, स्वायत्त दर्जामुळे शक्य होणार असल्याचे मत समूह
संचालक प्रा. चेतन वाकळकर यांनी व्यक्त केले.
स्वायत्ततेमुळे महाविद्यालय व औद्योगिक जगत यांच्यामधील ज्ञानाची दरी नक्कीच कमी
होईल व विद्यार्थ्यांना नोकरीच्या, व्यवसायाच्या अनेक संधी प्राप्त होतील, असे मत माहिती तंत्रज्ञान
तज्ञ डॉ. दिपक शिकारपूर यांनी व्यक्त केले. महाविद्यालयामध्ये या शैक्षणिक वर्षापासून
बी.एस.सी.आय.टी.(सायबर सेक्युरिटी) , बी.सी.ए.(सायन्स), बी.बी.ए.(हॉस्पिटॅलिटी व टुरिझम मॅनेजमेंट), बी.कॉम.(फायनान्सीएल मार्केटस्), बी.ए.(हयुमॅनिटीज) व अॅडव्हान्स डिप्लोमा (सायबर सेक्युरिटी, फॉरेन्सिक अकांऊटींग, फ्रॉड डिटेक्शन व रिस्क मॅनेजमेंट) इत्यादि. अभ्यासक्रम सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देऊन शैक्षणिक हिताचा विचार केला जाईल, तसेच
स्वायत्ततेमुळे येणा-या जबाबदा-या समर्थपणे पार पाडण्याचा विश्वास प्राचार्य डॉ. जनार्दन पवार यांनी
व्यक्त केला. तसेच सर्व विश्वस्त मंडळ, विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी
विद्यार्थी, पालक यांच्या सहकार्याने, महाविद्यालयाने शैक्षणिक क्षेत्रामधील एक महत्वाचा टप्पा पार
पाडला, अशा भावना व्यक्त करून, सर्वांचे आभार मानले आहेत.