….तर देशभर चक्का जाम करु : शेतकरी नेते बुटा सिंग
पिंपरी | टीम ऑनलाईन
१६ दिवसांपासून शेतकरी दिल्लीत आंदोलन करत आहेत. मात्र केंद्र सरकारने अद्याप त्याकडे दुर्लक्ष करत आहेत. शेतकऱ्यांच्या मागण्या सरकारने मान्य केल्या नाहीत. केंद्र सरकार बरोबरच्या अनेक चर्चा निष्फळ ठरत आहेत. त्वरित या बाबत मार्ग काढला नाही तर शेतकरी संघटना देशभर चक्का जाम करतील असा इशारा संयुक्त किसान मोर्चाचे नेते बुटा सिंग यांनी दिला आहे.
शेतकरी आणि सरकारमध्ये चर्चेच्या विविध फेऱ्या पार पडल्या. पण यामध्ये अजूनही तोडगा निघालेला नाही. शेतकऱ्यांनी हा कायदा रद्द करण्याची मागणी केली आहे. पण हा कायदा संपूर्णपणे रद्द होणार नसल्याची भूमिका केंद्र सरकारने घेतली आहे. त्यामुळे आता शेतकरी काय करतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
काही दिवसांपूर्वी शेतकरी संघटनांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भेट घेतली होती. परंतु या चर्चेत काहीही तोडगा न निघाल्यानंतर सिंह यांनी आज पुन्हा एकदा शेतकऱ्यांना चर्चेसाठी येण्याचं आवाहन केले आहे. सरकार कायद्यात बदल करण्यासाठी तयार आहे. शेतकऱ्यांनी त्यांच्या मागण्या मांडण्याचं आवाहन देखील त्यांनी यावेळी केले. परंतु शेतकरी संघटनांनी हि मागणी धुडकावली आहे. रेल्वे बंद करण्याचा इशारा दिला आहे.
दरम्यान, सरकारच्या वतीने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे देखील मैदानात उतरले होते. त्यांनी शेतकऱ्यांशी चर्चा केली. परंतु यामधून काहीही मार्ग निघालेला नाही. त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या मागणीवर विचार करण्यासाठी विरोधी पक्षाच्या विविध नेत्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली होती.