‘ठाकरे सरकारचा सत्यनाश झाला पाहिजे’; निलेश राणेंची टीका
मुंबई – भाजप नेते निलेश राणे यांनी राज्य सरकारवर मंत्र्यांचे बंगले दालनांवर केलेल्या खर्चावरून निशाणा साधला आहे. ठाकरे सरकारचा सत्यनाश झाला पाहिजे, अशा शब्दात त्यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.
वाचा :-#RainAlert: मुबईसह कोकणात पुढचे 3 ते 4 तास ढगाळ वातावरणासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता
आर्थिक तंगीतही मंत्र्यांचे बंगले दालनांवर 90 कोटी रुपये खर्च या बातमीचा संदर्भ निलेश राणे यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मंत्री आदित्य ठाकरे शासकीय बंगल्यात राहत सुद्धा नाही तरीदेखील त्यांच्या बंगल्यावर करोडोचा खर्च कशासाठी?? शेतकऱ्याला द्यायला पैसे नाही पण बंगले चकाचक करायला आणि नवीन गाड्या घ्यायला ह्या सरकारकडे पैसे आहेत. ह्या ठाकरे सरकारचा सत्यानाश झाला पाहिजे, असं राणे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, राणेंनी केलेल्या टीकेवर ठाकरे सरकारकडून काय प्रत्युत्तर येत हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.