जाणून घ्या,अर्थसंकल्प सादर करण्याची वेळ सकाळी 11 वाजता का? ‘हे’ आहे कारण
नवी दिल्ली : केंद्रीय अर्थसंकल्पाबाबत काही अशा गोष्टी तुम्हाला माहित आहे का? काही वर्षापूर्वी अर्थसंकल्प संध्याकाळी 5 वाजता सादर केला जात होता. त्यामागे विशेष कारण होतं. भारतीय अर्थसंकल्पाच्या इतिहासात अशा काही घटना नोंद आहेत.
मोदी सरकारच्या काळात अर्थसंकल्पाच्या काही परंपरा बदलल्या गेल्या. पूर्वी अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्याच्या अंतिम आठवड्यात मांडला जात होता. जो बदलून 1 फेब्रुवारी निश्चित करण्यात आला. त्याचसोबत रेल्वे अर्थसंकल्प संपवून त्याचा समावेश सामान्य अर्थसंकल्पात केला जाऊ लागला.
संध्याकाळी 5 वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची परंपरा ब्रिटिश राजवटीपासून सुरु होती. मात्र 2001 मध्ये यशवंत सिन्हा यांनी ही परंपरा बदलून सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर करण्याची नवीन परंपरा सुरु केली. त्यावेळी देशात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वातील एनडीए सरकार होतं.
अर्थसंकल्प भारताच्या संसदेत पास होणं गरजेचे होते. म्हणून ब्रिटनमध्ये सकाळी 11 वाजता अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर भारतात तो संध्याकाळी 5 वाजता सादर केला जात होता.