जागतिक बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेत भारत पहिल्यांदाच अंतिम फेरीत
मुंबई- जागतिक बुद्धिबळ ऑलम्पियाड स्पर्धेत भारतीय बुद्धिबळ संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. भारताचा संघ पहिल्यांदाच या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. यापूर्वी २०१४ मध्ये भारतीय संघाला या स्पर्धेत कांस्यपदक मिळाले होते. मात्र, आता अंतिम फेरीत धडक मारल्याने भारताचे किमान रौप्यपदक निश्चित झाले आहे.
भारताने उपांत्य फेरीत पोलंडच्या संघाचा पराभव केला. भारताची ग्रँडमास्टर कोनेरू हम्पी हिने निर्णायक सामन्यात विजय मिळवला. त्यामुळे अंतिम फेरीतील भारताचे स्थान निश्चित झाले. आता रविवारी रशिया आणि अमेरिका यांच्यात होणाऱ्या उपांत्य फेरीतील विजेत्याशी अंतिम फेरीत भारताची गाठ पडेल.
उपांत्य फेरीत पोलंडविरुद्ध भारतीय संघ पिछाडीवर पडला होता. पहिल्या फेरीत भारतीय संघाचा २-४ असा पराभव झाला होता. मात्र, दुसऱ्या फेरीत भारतीय संघाने ४.५-१.५ असा दिमाखात विजय मिळवला. यानंतर टायब्रेकर सामन्यात ग्रँडमास्टर कोनेरु हम्पी हिने बाजी मारत भारताला २-१ असा विजय मिळवून दिला.