breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

गलवान खोऱ्यातील तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांची मेजर जनरल लेव्हलची चर्चा सुरू

नवी दिल्ली | सोमवारी रात्री लडाखच्या गलवान खोऱ्यातील लष्करी चकमकीनंतर भारत आणि चीनमध्ये तणाव कायम आहे. हा तणाव कमी करण्यासाठी दोन्ही देशांमध्ये मेजर जनरल स्तरावर चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी बुधवारी दोन्ही देशांमध्ये मेजर जनरल पातळीवर चर्चा झाली. मात्र त्या चर्चेचा काहीच निष्कर्ष निघाला नव्हता.

दरम्यान भारताने बुधवारी रात्री उशीरा पुन्हा एकदा गलवान खोऱ्यावरील चीनचा दावा फेटाळून लावला. विदेश मंत्रालयाने म्हटले की, दोन्ही देशांमध्ये 6 जूनला कमांडर स्तरच्या छालेल्या चर्चेत परिस्थिती जबाबदारीने हाताळण्याचा करार झाला होता. आता अतिशयोक्तीपूर्ण केले जाणारे विधान 6 जून रोजी झालेल्या कराराच्या विरुद्ध आहेत.

खरंतरं लद्दाख येथील गलवान खोऱ्याच्या वादावरुन भारत आणि चीनमध्ये तणावाची परिस्थिती आहे. चीनचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता बुधवारी संध्याकाळी म्हणाले होते की, गलवान खोरे क्षेत्रातील सार्वभौमत्ता नेहमी चीनचीच असेल. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता अनुराग श्रीवास्तव म्हणाले की, आम्ही यापूर्वी म्हटल्याप्रमाणे, बुधवारी संध्याकाळी परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांशी लडाखच्या सद्यस्थितीबद्दल फोनवर चर्चा केली. ही परिस्थिती जबाबदार पद्धतीने हाताळली जावी, यावरही दोन्ही बाजूंनी सहमती दर्शविली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button