गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना पाळावे लागणार हे नियम
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा सगळ्याच गणेशोत्सवावर संकट आले आहे. गणेशोत्सव कोकणात अतिशय उत्साहाने आणि आनंदाने साजरा केला जातो. प्रत्येक चाकरमानी हा गणेशोत्सवाला आवर्जून कोकणात जातोच. मात्र आता चाकरमान्यांना कोकणात जायचं असेल तर त्यांना काही नियम अटी पाळाव्या लागणार आहे. यंदाचा गणेशोत्सव मुंबईत अतिशय साधेपद्धतीने करण्याचा निर्णय सरकारने केला आहे. त्याला गणेश मंडळांनी देखील पाठिंबा दिला आहे.
याआधी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबईकरांना गणेशोत्सवासाठी प्रवेश दिला जाणार आहे, याबात एक पत्रक देखील जारी केले होते. मात्र, याबाबत अधिक माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिले आहे. उदय सामंत यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली आहे. यांच्या अध्यक्षतेखाली काल शांतता समितीची बैठक पार पडली आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना चौदा दिवस कॉरटाइन ठेवण्यापेक्षा सात दिवस ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यांना कोकणात गणेशोत्सवासाठी येताना टोल माफ सुविधा देण्यात येणार आहे. त्यांची कोविड-19 ची तपासणी करणे आणि त्याचा खर्च शासनाने करावा अशा विविध विषयांवर शुक्रवार बैठकीत चर्चा करण्यात आली.
गणेशोत्सावासाठी चाकरमान्यांना ‘हे’ नियम पाळावे लागणार आहे.
चाकरमान्यांना गावी गेल्यावर 14 एवजी आता 7 दिवस क्वारंटाईन रहावे लागणार आहे..
पासेसची व्यवस्था आणि प्रवासाचे नियोजन कराव लागणार आहे.
कोकणात गणेशोत्सवासाठी येताना टोल माफ सुविधा देण्यात येणार आहे.
कोविड-19 ची तपासणी करणे आणि त्याचा खर्च शासनाने करावा.
कोकणात येणाऱ्या सर्व चाकरमान्यांची विशेष काळजी घेण्यात येईल.
चाकरमान्यांनी गणपतीला आलेच पाहिजे, हीच आमची भूमिका आहे.
त्यांना कोकणात येण्यास विरोध नाही त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये.