breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

खातेवाटपानंतर आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

मुंबई | महाईन्यूज

गेल्या आठवडाभरापासून तीन पक्षांच्या वाटाघाटीत रखडलेले राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप अखेर जाहीर झालेले आहे. या खातेवाटपामध्ये पहिल्यांदाच मंत्रिमंडळात समावेश झालेले युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्याकडे पर्यटन, पर्यावरण आणि राजशिष्टाचार मंत्रालयांचा कार्यभार सोपवण्यात आलेला आहे. दरम्यान, खातेवाटप जाहीर झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आवडती खाती मिळाल्याने आनंद व्यक्त केलेला असून, सर्वांना सोबत घेऊन काम करणार असल्याचे आदित्य ठाकरे यांनी बोलले आहे.

खातेवाटप झाल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले की, ”मला पर्यावरण आणि पर्यटन अशी आवडती खाती मिळाली, याचा मला आनंद आहे. आता मी सर्वांना सोबत घेऊन काम करणार आहे. माझ्यामते पर्यटनावर आपण संपूर्ण राज्याची अर्थव्यवस्था उभारू शकतो व सद्यस्थितीत महाराष्ट्रात पर्यटनवाढीस वाव आहे. गडकिल्ले, समुद्र किनारे यामुळे राज्यात पर्यटनवाढ होऊ शकते,”

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button