breaking-newsराष्ट्रिय
कोरोनामुळे सॅनिटाईज केल्याने २ हजारांच्या १७ कोटींच्या नोटा खराब! आरबीआयचा अहवाल
नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटकाळात भारतीय चलनातील सर्वाधिक नोटा खराब झाल्या आहेत. कारण या नोटांना देशातील नागरिकांनी सॅनिटाईज केले, त्याचबरोबर काहींनी तर धुवून वाळवल्या देखील आहेत. त्यामुळे आरबीआयकडे येणाऱ्या खराब नोटांच्या संख्येने सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.
आरबीआयच्या अहवालात म्हटले आहे की, १७ कोटी रुपयांच्या यावर्षी दोन हजारांच्या नोटा खराब झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या ३०० पट जास्त असून यात २०० रुपयांच्या नोटा दुसऱ्या स्थानी आहेत. तर ५०० रुपयांच्या नोटा तिसऱ्या स्थानी आहेत. सर्व नोटा खराब होण्याचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढले आहे.