कृषी विधेयक मंजूर करायला केंद्र सरकारने घाई केली – शरद पवार
मुंबई – केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्यावरून सध्या प्रचंड वादंग सुरू आहे. त्यातच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही केंद्र सरकारवर टीका केली आहे. सरकारने विधेयक मंजुर करायला घाई केल्यानेच ही समस्या निर्माण झाली आहे. आम्ही याबाबत सरकारला सांगत होतो, मात्र आमचं ऐकलं गेलं नाही, असा आरोपही पवार यांनी केला आहे.
वाचा :-कृषी कायद्याविरोधात बातचीत करण्यासाठी शरद पवार थेट राष्ट्रपतींना भेटणार
शरद पवार म्हणाले, “पंजाब आणि हरयाणाचे शेतकरी गहू आणि तांदळाचे मुख्य उत्पादक आहेत. हेच शेतकरी आज कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करत आहेत. जर यावर लवकरात लवकर तोडगा काढला गेला नाही तर देशभरातील शेतकरी त्यांच्या सोबत असतील.”
वाचा :-ज्यावेळी फार्म बिल पास झाले त्यावेळी सरकारने घाई करु नये अशी विनंती केलेली होती- शरद पवार
“जेव्हा कृषी विधेयकं मंजुर केली जात होती. तेव्हा आम्ही सरकारला म्हटलं होतं की घाई करु नका. या विधेयकांना लोकसभेच्या निवड समितीकडे पाठवण्यात यावं तसेच यावर चर्चेची आवश्यकता आहे. मात्र, सरकारनं आमचं ऐकलं नाही आणि घाईत विधेयक मंजुर करण्यात आलं. आता सरकारला आपल्या याच घाई-गडबडीच्या अडचणींचा सामना करावा लागत आहे,” असंही शरद पवार यांनी म्हटलं आहे.