breaking-newsराष्ट्रिय
कांद्याची महागाई कोर्टात, केंद्रीय मंत्र्याविरोधात तक्रार दाखल
कांद्याच्या वाढत्या भाववाढ नियंत्रणात आणण्यात केंद्र सरकारला अपयश आले असून यावरून सरकारकडून जनतेची दिशाभूल केली जात आहे, असा आरोप करत केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांच्याविरुद्ध एका व्यक्तीनं तक्रार दाखल केलेली आहे. बिहारमधील मुझफ्फरपूर येथील कोर्टात राजू नय्यर यांनी न्यायधंडाधिकाऱ्यांकडे पासवानांविरोधात फौजदारी तक्रार केलेली आहे. या तक्रारीवर १२ डिसेंबर रोजी सुनावणी होणार आहे.
मिठनपुरात राहणारे राजू नय्यर यांनी अॅड. मनोजकुमार सिंग यांच्यामार्फत तक्रार केली आहे. या तक्रारीच्या आधारे भारतीय दंड विधान कलम ४२० (फसवणूक), ५०६ (धमकावणे), ३७९ (चोरी) अन्वये पासवनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आह. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.