breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाई पुन्हा सुरू

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात प्लास्टिक पिशव्यांवरील कारवाई पुन्हा सुरू करण्यात आली आहे. पालिका आयुक्तांनी कारवाई तीव्र करत शहरातून प्लास्टिक हद्दपार करण्याच्या सूचना दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

कल्याण-डोंबिवली शहरात प्लास्टिकचा वापर वाढल्याने आणि या प्लास्टिकचा कचरा नाल्यात आणि कचऱ्यात फेकला जात असल्यामुळे कचऱ्याची समस्या बिकट झाली होती. या प्लस्टिकचे विघटन होत नसल्याने या प्लास्टिक पिशव्यांत गुंडाळून फेकला जाणार कचरा त्यातच सडत असल्यामुळे दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे. पालिका प्रशासनाने शून्य कचरा मोहीम राबविण्यास सुरुवात केली आहे. ओल्या कचऱ्यात प्लास्टिक टाकल्यास तसेच ओला व सुका कचरा एकत्र केल्यास हा कचरा स्वीकारला जाणार नसल्याचे पालिकेने जाहीर केले आहे. तरीही चाळी आणि झोपडपट्ट्यांमधील नागरिक रस्त्याच्या कडेला प्लास्टिकच्या पिशव्यांतून कचरा भरून फेकत असल्यामुळे शहराच्या विद्रुपीकरणात भर पडत आहे.

नागरिकांना प्लास्टिकच्या पिशव्या खरेदीदरम्यान मिळत असल्यामुळेच या प्लास्टिकचा कचऱ्यात ढीग साचतो. म्हणून प्लास्टिक पिशव्या नागरिकाना सहज उपलब्ध करून देण्याऱ्या विक्रेत्यांवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. प्रत्येक प्रभागातील दुकानांमध्ये तपासणी करून त्यांच्याकडील प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करत त्यांच्यावर दंडात्मक कारवाईचा बडगा उगारला जात आहे. पालिका प्रशासनाने अचानक सुरू केलेल्या या कारवाईमुळे दुकानदारांची धावपळ उडाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button