breaking-newsराष्ट्रिय

‘कर्जमाफी कृषी धोरणाचा भाग होऊ देऊ नका’

पाऊस आणि छोट्या बाजारपेठा या दोन गोष्टी शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत. शेतीची समस्या ही आर्थिक स्वरूपाची आहे. जेव्हा शेतकऱ्याला कर्ज फेडणेच अशक्य होऊन जाते. त्यावेळीच हे करायला हवं आणि तेही क्वचित. शेती फायद्यात राहिल यासाठी तिला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याची गरज आहे. त्यामुळे कर्जमाफी कृषी धोरणाचा होऊ देऊ नका, असा सल्ला हरित क्रांतीचे जनक एम.एस. स्वामीनाथन यांनी राज्यकर्त्यांना दिला आहे.

पाच राज्यातील निवडणुकांनंतर काँग्रेसने तीन राज्यात शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतला. याचबरोबर केंद्रातील मोदी सरकारही यावर विचार करीत आहे. शेतकरी कर्जमाफीला मात्र स्वामीनाथन यांनी नकारात्मक प्रतिसाद दिला आहे. ते म्हणाले, शेतकरी कर्जमाफी अर्थव्यवस्थेसाठी चांगली नाही. राज्यकर्त्यांनी केवळ राजकीय फायद्यासाठी कर्जमाफीसारखे निर्णय टाळायला हवे. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारून नवी पिढी शेतीकडे वळेल, अशी धोरणे ठरविण्याची गरज आहे. त्यासाठी शेतीला व्यवहारीकदृष्ट्या सक्षम करावे लागेल, असेही ते म्हणाले.
हमीभावासाठी सक्षम धोरण हव

खरेदी प्रक्रिया व्यवस्थित झाल्यानंतरच हमीभावाचा पर्याय उपयोगी ठरेल. यासाठी किंमत, खरेदी आणि सार्वजनिक वितरण प्रणालीसाठी एक धोरण हवे. जर अपेक्षित खरेदी होत नसेल, तर हमीभाव फायदा होणार नाही. त्यासाठीच किंमत आणि खरेदीसाठी धोरण गरजेचे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button