breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई
Balasaheb Patil : शेतकऱ्यांची मानहानी न होता कर्जमुक्ती योजनेचा लाभ : सहकारमंत्री बाळासाहेब पाटील
मुंबई । महाईन्यूज । प्रतिनिधी
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतून शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी प्रयत्न सुरु झाले असून शेतकऱ्यांची मानहानी न होता त्यांना योजनेचा लाभ दिला जात आहे. नियमितपणे कर्जफेड करणाऱ्यांच्या बाबतीत राज्य शासन सकारात्मक निर्णय घेणार आहे, अशी माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.
विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी प्रश्नोत्तराच्या तासात सहकारमंत्री पाटील बोलत होते. यावेळी वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख यांनी विभागाच्या मागण्या सादर केल्या.