breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

कर्जमाफीची प्रक्रिया तीन महिन्यांत पूर्ण करणार- अजित पवार

नागपूर | महाईन्यूज

ठाकरे सरकारवर शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी, यासाठी विरोधकांकडून प्रचंड दबाव टाकला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवारांची बैठकही झालेली आहे. त्यानंतर ठाकरे सरकार लवकरच कर्जमाफी देणार असल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधलेला आहे.

शेतकरी कर्जमाफीची प्रक्रिया दोन ते तीन महिन्यात पूर्ण करणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. शेतकरी कर्जमाफी कशी द्यायची याबाबत मध्य प्रदेश, राजस्थान या राज्यांमधील कर्जमाफीचा अभ्यास सुरू आहे. आधार क्रमांक लिंक करून कर्जमाफी देता येईल का, याचीही चाचपणी सुरू असल्याचं पवारांनी सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button