breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

कंगनाने सलमान खानला पटवण्याचा खूप प्रयत्न केला होता, तेव्हा तो म्हणाला…: राखी सावंत

मुंबई: मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्यानंतर अभिनेत्री कंगना रनौतवर टीकेची झोड उठलेली आहे. राजकीय क्षेत्रापासून मनोरंजन विश्वातील कलाकारांनीही कंगनाला चांगलीच समज दिली. अशातच ‘ड्रामाक्वीन’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री राखी सावंत हिनेही कंगनावर चांगलेच तोंडसुख घेतलेले आहे. राखी सावंतने इन्स्टाग्रामवर व्हिडीओ शेअर करत कंगनावर घणाघात केलेला आहे. “कंगना, तुझी एक अत्यंत वाईट सवय आहे. जेव्हा कोणी तुझं ऐकत नाही, तेव्हा तू बडबड करायला लागतेस. हा असा आहे, तो तसा आहे. तू विवाहित पुरुषांच्या आयुष्यात जातेस, मग तो हृतिक रोशन असो किंवा आदित्य पांचोली, हजार माणसं तुझ्या आयुष्यात आलेली आहे. तू त्यांचं घर बरबाद करते आणि म्हणतेस की यांनी माझ्यासोबत असं केलेलं” असा आरोप राखी सावंतने केलेला आहे.

“महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न करु नकोस. सुशांतच्या मृत्यूचा फायदा घेऊन पब्लिसिटी घेण्याचा प्रयत्न करु नकोस. कंगनाने अभिनेता सलमान खानला पटवण्याचा खूप प्रयत्न केलेला, पण सलमान बोलला, चल हट गंदी, चल निकल. मोठेमोठ्या स्टार्सच्या आयुष्यात तिने जायचा प्रयत्न केला, मी त्या स्टार्सचे नाव घेऊ शकत नाही” असं राखी म्हणते. “मला सुशांतच्या निधनाचे दुःख आहे. तो माझाही मित्र होता. पण याचा अर्थ कंगना जे बोलेल, त्यावर देशाच्या जनतेने विश्वास ठेवावा, असा होत नाही. कंगना, तू हे विसरु नकोस की या महाराष्ट्रात सगळ्यांची स्वप्ने पूर्ण होतात. सुशांतसाठी तू पाऊल उचललेस ठीक आहे, पण मराठी माणसांना काही बोललीस, एक-एक मराठी माणसाशी जर तू पंगा घेशील, तर तुला महाराष्ट्रात राहणे अवघड होईल, तुला महाराष्ट्रात शूटिंग करणे अवघड होईल. “अगं ए भवाने, आमचं डोकं फिरलं ना, आता माझी सटकली तर, तू गेलीस, समज, भवाने” असा इशारा राखीने दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button