breaking-news
औरंगाबाद महापालिकेची निवडणूक पुढे ढकला : इम्तियाज जलील
कोरोना व्हायरसने घातलेल्या थैमानाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद महापालिका निवडणूक रद्द करावी, अशी मागणी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी केली आहे. जगभरात दहशत निर्माण केलेल्या कोरोनाने भारतातही दहशत निर्माण केली आहे. देशासह राज्यात कोरोनामुळे अनेक नेत्यांनी आपले महत्त्वाचे दौरे रद्द केले आहेत.
राज्य आणि केंद्र सरकारने सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचा सल्ला दिला आहे. याचा आधार घेत इम्तियाज जलील यांनी औरंगाबाद निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.