औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोधच- अशोक चव्हाण
जालना – औरंगाबादच्या नामांतरवरून सध्या महाविकास आघाडीत धुसफूस सुरू आहे. शिवसेना आणि काँग्रेस यांच्यातील वाद यामुळे चव्हाट्यावर आले. त्याचा फायदा घेत विरोधी पक्षेनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाला नुरा कुस्तीची उपमा दिली. मात्र, यावर बोलताना काँग्रेस नेते अशोक चव्हाण म्हणाले की, औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावरुन शिवसेना आणि काँग्रेसमध्ये नुरा कुस्ती सुरु नाही. औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोधच आहे. ते शनिवारी जालन्यात प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
वाचा :-चंद्रकांत पाटलांनी सामना वाचल्यानंतर संजय राऊत म्हणाले…
औरंगाबादचे नामांतर हा महाविकासआघाडी सरकारच्या कॉमन मिनिमम प्रोगामचा भाग नाही. औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोध आहे. आमची नुरा कुस्ती सुरु नाही तर आम्ही या मुद्द्यावरुन भाजप आणि एमआयएमसोबत थेट नुरा कुस्ती खेळायला तयार आहोत, असे अशोक चव्हाण यांनी म्हटले.
वाचा :-लोकसभा, विधानसभा, महापालिका, आता ‘चाळ’ कमिटीच्या निवडणुकीतही भाजप नेत्यांनी उतरावे
तसेच औरंगाबादचे नामांतर हा स्थानिक पातळीवरचा मुद्दा आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्याविषयी कोणतेही वक्तव्य केलेले नाही, याकडेही अशोक चव्हाण यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.य निरुपम यांनी शिवसेनेला लगावला.