breaking-newsक्रिडा
ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन, भारताला विजयाची संधी
सिडनी – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथ्या आणि अखेरच्या कसोटीतील चौथ्या दिवशी पावसाच्या व्यतयामुळे अवघ्या 24.5 षटकांचाच खेळ होऊ शकला. कालच्या 6 बाद 236 वरून पुढे खेळताना ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 300 धावांवर आटोपला. भारताने ऑस्ट्रेलियाला फॉलोऑन दिला असून दुसऱ्या डावात चौथ्या दिवसअखेर ऑस्ट्रेलियाने बिनबाद 6 धावांची मजल मारली आहे.
कसोटी सामन्याचा उद्याचा दिवस बाकी असून भारताकडे अजूनही 316 धावांची आघाडी आहे. त्यामुळे उद्याच्या दिवशी पावसाचा व्यतय न आल्यास आणि ऑस्ट्रेलियाचे सर्व फलंदाज बाद केल्यास भारताला 3-1 ने मालिका जिंकण्याची नामी संधी आहे.