breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन चूक केलीय – रामदास आठवले

पुणे |महाईन्यूज|

ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाऊन चूक केली. त्यांना पक्ष बदलायचा होता तर त्यांनी आरपीआयमध्ये यायला पाहिजे होते, अशी प्रतिक्रिया केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी खडसे यांच्या पक्षांतराबाबत व्यक्त केली.

तीन दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे बारामती तालुक्यातील शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय मंत्री आठवले आज, गुरुवारी बारामतीत आले होते. त्यावेळी ते बोलत होता.

खडसे म्हणाले, भाजपचे दहा-पंधरा आमदार पक्ष सोडून जातील यात काही तथ्य नाही. खडसेंकडे आमदारकी नव्हती म्हणून ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जात आहेत. तेथे गेल्यानंतर त्यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. तर त्यांनी पक्ष बदलायचा नव्हता. जर पक्ष बदलायचा होता तर त्यांनी आरपीआयमध्ये यायला पाहिजे, अशी आमची भूमिका होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button