उमेदवारांच्या संख्येत सात वर्षांत 23 टक्क्यांनी घट, पण कलंकित वाढले
महाईन्यूज | नवी दिल्ली |
दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापू लागले आहे. पक्ष नाव आणि कामाच्या बळावर मते मागू लागले आहेत. परंतु ज्या उमेदवारांच्या नावे मते मागितली जात आहेत, त्यापैकी अनेक जणांवर गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे. धक्कादायक म्हणजे अशा उमेदवारांच्या संख्येत वाढ होत चालली आहे. २००८ ते २०१५ दरम्यान दिल्ली विधानसभा निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांचे प्रमाण २३ टक्क्यांनी घटले.
परंतु गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांचे प्रमाण ३ टक्क्यांनी वाढले. २००८ मध्ये असे काँग्रेसचे सर्वाधिक उमेदवार रिंगणात होते. २००८ मध्ये हा विक्रम भाजपच्या नावावर गेला. आश्चर्य म्हणजे २०१३ ते २०१८ दरम्यान सत्ताधारी आम आदमी पार्टीमध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांचे प्रमाण ५ टक्क्यांनी वाढले. ही माहिती निवडणूक सुधारणा व प्रक्रियेवर देखरेख ठेवणारी संस्था एडीआरच्या ताज्या अहवालातून जाहीर झाली आहे.