breaking-newsमहाराष्ट्रमुंबईराष्ट्रिय

उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी जाहीर करावी लागणार

लोकसभा निवडणुकीची राज्यात तयारी सुरू

उमेदवाराकडून निवडणूक आयोगाला सादर केल्या जाणाऱ्या प्रतिज्ञापत्राबरोबरच, गुन्हे दाखल असल्यास त्यांची माहिती प्रसारमाध्यांतून मतदारापर्यंत पोहचवावी लागणार आहे. त्याचबरोबर ज्या उमेदवारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे, त्याची माहिती जाहीर करणे राजकीय पक्षांनाही बंधनकारक राहणार आहे.

सर्वोच्च न्यायालयानेच या संदर्भात एक निर्णय दिला आहे. त्यानुसार लोकसभा निवडणुकीत अशी माहिती जाहीर करणे अनिवार्य राहणार आहे, असे राज्याचे उपमुख्य निवडणूक अधिकारी अनिल वळवी यांनी सांगितले.

लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुका आता काही महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत. साधरणत फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवडय़ात किंवा मार्चच्या पाहिल्या आठवडय़ात निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने राज्यात मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. निवडणुकीच्या कामासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम तयार करण्यात आला आहे.

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना आयोगाकडे प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांची मालमत्ता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती देणे बंधनकारक आहे. पोलीस ठाण्यात दाखल असलेले गुन्हे, न्यायप्रविष्ट प्रकरणे, शिक्षा झाली असल्यास त्याची माहिती द्यावी लागते. मात्र यापुढे केवळ प्रतिज्ञापत्रात अशी माहिती देऊन चालणार नाही तर, वर्तमानपत्रांतून, इलेक्ट्रॉनिक माध्यमांतून मतदारांच्या माहितीसाठी ती जाहीर करणे सक्तीचे राहणार आहे. त्याचबरोबर राजकीय पक्षांनाही त्यांच्या उमेदवारांची अशीच माहिती जाहीर करावी लागणार आहे.

३६ लाख नवीन मतदारांची नोंदणी

मतदार नोंदणी मोहिमेत राज्यात ३६ लाख नव्याने मतदारांची नोंदणी झाली आहे. अंतिम मतदार यादी ११ जानेवारी २०१९ रोजी जाहीर करण्यात येणार आहे. २०१४ मधील निवडणुकीत ८ कोटी ४४ लाख मतदारांची संख्या होती, अशी माहिती वळवी यांनी दिली.  नव्याने झालेली नोंदणी विचारात घेता मतदारांची संख्या नऊ कोटींच्या जवळपास जाईल, असा अंदाज आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button