breaking-newsआंतरराष्टीय
इंग्लंडच्या ‘त्या’ करारावर सही करण्यास मोदींनी दिला नकार
लंडन : इंग्लंडमध्ये हजारो भारतीय बेकायदेशीररीत्या वास्तव्य करत आहेत. त्यांची पुन्हा भारतात रवानगी करण्यासंदर्भात भारत सरकारनं करार करावा अशी इंग्लंडची इच्छा आहे. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदींनी हा करार करण्यास नकार दिला आहे. भारतीयांना व्हिसा देण्याची यंत्रणा सोपी सुटसुटीत नसल्याचा निषेध म्हणून भारत सरकार त्या करारावर सही करत नसल्याची माहिती एका इंग्रजी वृत्तपत्राला देण्यात आली.
गृह राज्यमंत्री किरण रिजिजू यांनी या कराराची रुपरेषा जानेवारीमध्ये ठरवली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एप्रिल महिन्यात लंडनला भेट दिली त्यावेळी या करारावर सह्या होतील अशी अपेक्षा होती. परंतु भारतीयांना व्हिसा देण्याची पद्धत इंग्लंडने कबूल केल्याप्रमाणे सोपी केलेली नाही. त्यामुळे भारताला एकतर्फी करार मानण्याची आवश्यकता नाही अशी भारताची भूमिका आहे.